About the Department
|| जो जे वांछील, तो ते लाहो ||
महाराष्ट्रातील मराठी ही एक प्रमुख भाषा आहे. तिच्याद्वारे व्यक्त होणाऱ्या विविध कला आणि साहित्यकृतींमुळे ती समृद्ध बनलेली आहे. नुकताच अलीकडे भारत सरकारच्या वतीने मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आहे. मराठी ही भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून, मराठी भाषा महाराष्ट्रातील लोकांच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. मराठी भाषेत अनेक श्रेष्ठ साहित्यकृती आणि कलाकृती आहेत, ज्यामुळे मराठी भाषेला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठी भाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत ज्ञान मिळण्यास मदत होते, ज्यामुळे ते अधिक सहजपणे शिक्षण घेऊ शकतात.
मराठी विभाग १९९२ साली 'पूरक मराठी ' ( ए सी मराठी ) विषयास मान्यता घेऊन सुरु करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १९९४ साली मुख्य मराठी विषय सुरु करण्यात आला. विभागात अध्ययन अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पूरक विविध उपक्रम राबविले जातात. त्यातील काही ठळक उपक्रम म्हणजे महर्षी कर्वे व्याख्यानमाला , विविध स्थळ भेटी , शैक्षणिक सहली , मान्यवरांची व्याख्याने , परिसंवाद आणि कार्य शाळाचे आयोजन , विद्यार्थिनी दत्तक योजना आणि माजी विद्यार्थिनीच्या माध्यमातून ‘संवाद समन्वय’ असे विविध उपक्रम राबविले जातात . लेखन गुणांना प्रोत्साहन देणारे बीजांकुर व कौशल्य विकासास प्राधान्य देणारा, संशोधन व हमखास रोजगार मिळवून देणारा ‘मोडी लिपीचा वर्ग, बी.ए. नंतर प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्राथमिक स्पर्धा मार्गदर्शन केंद्र हे आमचे विशेष आहेत. आता पर्यत झालेल्या आपल्या मराठी विभागात विशेष व्याख्यानमालेत, चर्चासत्र , कार्यशाळा व विशेष उपक्रमाअंतर्गत विविध मान्यवरांची व्याख्याने झालेली आहेत. यामध्ये डॉ विजया राज्याध्यक्ष , नीरजा , प्रतिमा जोशी , डॉ विलास खोले , सिंधुताई सपकाळ , शाहीर साबळे , शाहीर संभाजी भगत , कॉ . गोविद पानसरे, अभिराम भडकमकर , डॉ शी गो देशपांडे, डॉ पुष्पलता राजापूर तापस , प्रतिमा इंगोले इत्यादी लेखक , समीक्षक व विचारवंत मराठी विभागात येऊन विचार व्यक्त केलेले आहेत.
आता पर्यत मराठी विभागात कु.चंचल जाधव हिने विद्यापीठात विशेष श्रेणी सह सुवर्ण पदक हि पटकावले आणि विभागाचा नाव लौकिक वाढविला. त्याच बरोबर नयना जाधव , सविता वास्टर , पूजा पराडकर अशा विद्यार्थिनीनी विद्यापीठाचे सुवर्ण पदक पटकावले आहे . मराठी पदवी शिक्षणानंतर आता अनेक विद्यार्थिनी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत शिक्षक , प्राध्यापक , स्पेशल शिक्षक , पोलीस, ग्रंथपाल , पत्रकार , बँक , प्रशासकीय सेवा, तलाठी , वकील इत्यादी अशा अनेक क्षेत्रात विद्यार्थिनी कार्यरत आहेत.